- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शहराच्या जरीपटका पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये(लॉकअप)आत्महत्या केल्याचे प्रकरण चांगलेच तापून आहे.अटकेतील १९ वर्षीय आरोपीने गुरुवार २२ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास कोठडीजवळ कुणीही नसल्याची संधी साधून त्याने चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.सकाळी सहा वाजता सदरची बाब उघडकीस येताच ठाण्यात एकच खळबळ उडाली.नागेंद्रकुमार रामजी भारतिया वय १९ वर्षे,प्रयागराज,उत्तर प्रदेश असे मृतकाचे नाव आहे.घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी,अप्पर आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्यासह परिमंडळ सहाचे पोलिस उपायुक्त संदीप पखाले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्यात दाखल होत परिस्थितीची पाहणी केली.प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला होता.त्यातच,पोलिसांचा हलगर्जीपणा व तक्रादाराने मागितलेल्या पैशांमुळे तणावात येऊन मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.दरम्यान, नागेंद्रच्या मृतदेहाचे काल शुक्रवारी न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात आला.अश्यातच आता या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी रात्र पाळीत नितीन आत्राम,तर आरोपींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अभय खडसे, प्रमोद दुधकवरे व राहुल चव्हाण यांच्यावर होती. प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळल्यानंतर कर्तव्यावरील चौघांनाही तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना असल्याने पुढील तपास सीआयडी करत आहे.
- Advertisement -

