- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा व अखिल महाराष्ट्र पत्रकार,पत्रलेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच तेलंगणा राज्याच्या हैदराबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बहुभाषिक काव्य संमेलनात गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक या खेडे गावचे युवा विद्रोही कवी प्रभाकर देविदास दुर्गे(छायासुत) यांना राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्कार २०२५ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमात विविध राज्यातून आपापल्या मातृभाषेचा गौरव करण्याकरीता संपूर्ण देशभरातील साहित्यिकांची उपस्थिती होती.त्यात कवी प्रभाकर देविदास दुर्गे (छायासुत)यांचा देखील सहभाग होता.त्यांनी ‘शेतकऱ्याची दिवाळी’ ही जिवंत कविता सादर करत संपूर्ण देशभरातील आलेल्या साहित्यिक,रसिकांची मने जिंकत माय मराठीचा झेंडा रोवला.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा.डॉ.विद्या देवधर(सुप्रसिद्ध लेखिका हैदराबाद),डॉ.जयलक्ष्मी सानिपिना(इंटरनॅशनल आयकॉन),सदानंद येलगंटी (सुप्रसिद्ध साहित्यिक कर्नाटका),ज्योती पांका (आंतरराष्ट्रीय स्कूल,कॉलेज संस्थापिका,सुप्रसिद्ध कवयित्री अरुणाचल प्रदेश),प्रफुल केवट(सुप्रसिद्ध साहित्यिक आसाम)अध्यक्षीय मंडळ प्रमुख हेमलता गीते व या संस्थेचे सर्वेसर्वा शिवराज पाटील व विविध मान्यवर उपस्थित होते.कवी प्रभाकर दुर्गे यांच्या सन्मानाबद्दल कुटूंबीय,सहकारी मित्र-मैत्रिणी,गाववासीय जनता तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- Advertisement -

