उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन येत्या २ डिसेंबरला निवडणूक तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊ निकाल जाहीर होणार आहे.आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.अश्यातच सोलापूर जिल्ह्याच्या अनगर नगरपंचायतीत मोठी घडमोड घडली असून मतमोजणी होऊ निकाल जाहीर होण्यापूर्वीच अनगर नगरपंचायतीचा निकाल लागला आहे.विशेष म्हणजे, आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती.पण,या मुदतीत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपच्या सर्व १७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.त्यातच,अनगर नगरपंचायतीत नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली असली तरी नगराध्यक्षपदासाठी मात्र भाजप व अजित पवार गटाच्या उमेदवारात लढत होणार आहे.भाजपने ही निवडणूकही बिनविरोध करण्यासाठी ताकद लावली होती.पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी आज पहाटेच्या सुमारास नगरपंचायत गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यामुळे भाजपच्या बिनविरोध नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या प्रयत्नांना सुरूंग लागला आहे.महत्वाचे म्हणजे,भाजप नेते राजन पाटील यांनी मोठी खेळी खेळल्याने १७ पैकी १७ उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.
जेवढे नगरसेवक तेवढेच अर्ज; पूर्णच्या पूर्णच बिनविरोध निवडून..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

