Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीनुसते शेतात खांब बसवून तारांची केली जोडणी; चक्क बिल आले ८५ हजारांचे-...

नुसते शेतात खांब बसवून तारांची केली जोडणी; चक्क बिल आले ८५ हजारांचे- विद्युत वितरण कंपनीचा अजब-गजब कारभार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातीलसिरोंचा तालुक्यातील मोकेला येथील एका शेतकरी महिलेच्या बाबतीत विद्युत वितरण कंपनीचा अजब-गजब कारभार पाहून पायाखालची जमीनच सरकली आहे.

कृषिपंपासाठी विद्युत रोहित्र व मीटर न बसविताच विद्युत वितरण कंपनीने ८५ हजार ४४० रुपयांचा बिल पाठविला.या प्रकारामुळे चिंतेत पडलेल्या महिलेने संबंधित कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला निवेदन सादर करून विद्युत बिल माफ करण्याची मागणी केली होती.परंतु,आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसून येत नसल्याने विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

रामबाई दुर्गम ही महिला मोकेला येथील एक हेक्टर शेत जमिनीत कापूस हा पीक घेऊन आपला उदरनिर्वाह करीत आहे.पिकासाठी पाण्याची आवश्यकता भासत असल्याने सदर महिलेने बामणी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा करण्याबाबतचा अर्ज सादर केला होता.त्याअनुषंगाने २०१७ मध्ये शेतात खांब बसवून तारांची जोडणी करण्यात आली.मात्र, आजपर्यंत विद्युत रोहित्र व विद्युत मीटर सुद्धा बसविण्यात आले नाही.त्यामुळे कृषिपंपासाठी विद्युत पुरवठाच न जोडल्याने पिकांना पाणी देणे अशक्य होते.अशातच जून २०२२ मध्ये वीज वितरण कंपनीने चक्क ८५ हजार रुपयांचे बिल पाठविल्याने सदर महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली.विजेचा वापर न करताही कृषी पंपाला हजारोंचा बिल पाठविल्याने आश्चर्यचकित झालेल्या महिलेने बामणी येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे चौकशी केली. सोबतच निवेदन देऊन विद्युत बिल माफ करून नवीन मीटर बसवून देण्याची मागणी केली होती.परंतु, संबंधित कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारावर रोष व्यक्त केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!