- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या काल रविवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भारताने ७ विकेट गमावल्यानंतर २९८ धावा करून दक्षिण आफ्रिकेला २९९ धावांचे लक्ष्य दिले होते.मात्र,भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजून भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेता बनला.विजयाने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पसरले आणि रात्रीच्या सुमारासच सर्वत्र जल्लोष साजरा करून मोठा उत्सव साजरा करण्यात आला.दुसरीकडे,विजयानंतर क्रिकेट बोर्डाकडून संघाला ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते माजी खेळाडूंपर्यंत सर्वांनी संघाचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा शानदार विजय.अंतिम सामन्यातील त्यांची कामगिरी अविश्वसनीय कौशल्य आणि आत्मविश्वासाने भरलेली होती.संपूर्ण स्पर्धेत संघाने असाधारण टीमवर्क आणि चिकाटी दाखवली. खेळाडूंचे अभिनंदन.हा ऐतिहासिक विजय भविष्यातील विजेत्यांना खेळात रस घेण्यास प्रेरणा देईल.”
- Advertisement -

