Friday, May 1, 2026
Homeगोंदियाअपघात होताच आवाज उठवला जातो; त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो.. - रेल्वेच्या...

अपघात होताच आवाज उठवला जातो; त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो.. – रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले असून वन्यजीव प्रेमी तसेच संबंधित विभागाकडून अपघातानंतर उपाययोजना आखण्यासंदर्भात आवाज उठवला जातो.त्यानंतर मात्र त्याचा विसर पडतो; अशी म्हणण्याची वेळ आली आहे.त्याचे कारणही तसेच आहे; नुसत्या एकट्या गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाचा विचार केला तर आतापर्यंत गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावर तब्बल १२५ वन्यप्राण्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.यात वाघासह इतर प्राण्यांचा सुद्धा समावेश आहे.त्यातच दरवर्षी या मार्गावर वन्यजीवांचा बळी जात असल्याने सदरचा मार्ग वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे.गोंदिया-बल्लारशा हा रेल्वे मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य,नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प या ‘कॉरिडॉर’ लगत जातो. हाच रेल्वे मार्ग पुढे जबलपूर आणि बालाघाटपर्यंत तर चांदाफोर्ट पुढे तेलंगणापर्यंत जातो.त्यामुळे या रेल्वे मार्गावरून बरेचदा वन्यप्राण्यांची वर्दळ असते.त्यामुळेच रेल्वे विभागाने २०१८ मध्ये वन्यप्राण्यांसाठी असुरक्षित रेल्वे मार्गांची यादी जाहीर केली होती व उपाययोजनेबाबतही शिफारसी केल्या होत्या.यात गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाचा सुद्धा समावेश होता परंतु,अद्यापही उपाययोजना केलेल्या नाहीत.त्यामुळे या रेल्वे मार्गावर वन्यप्राण्यांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे.वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला तारांचे कुंपण,भुयारी मार्गासह इतर उपाययोजना करण्याची गरज आहे.पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!