Monday, August 24, 2026
Homeनागपूरकाय सांगता..? सावळा गोंधळ असलेले संपूर्ण पोलीस पाटील पद रद्द.. -...

काय सांगता..? सावळा गोंधळ असलेले संपूर्ण पोलीस पाटील पद रद्द.. – उच्च न्यायालयाचा निर्वाळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या विविध गावांमधील पोलिस पाटील भरतीची जाहिरात १६ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर ८ व ९ एप्रिल २०२३ रोजी लिखित परीक्षा,त्यानंतर १० व ११ एप्रिल रोजी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.१२ एप्रिल २०२३ रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. मात्र,काही उमेदवारांनी मुलाखत प्रक्रियेत सावळा गोंधळ झाल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार,जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दाखल घेत मे २०२३ मध्ये सादर केलेल्या अहवालात निवड प्रक्रिया बोगस व अपारदर्शक पद्धतीने झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.या आधारावर ४ जुलै २०२३ रोजी निवड प्रक्रिया व नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले.त्यामुळे पात्र उमेदवारांनी या निर्णयाला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण म्हणजेच मॅटमध्ये आव्हान दिले होते.पण,न्यायाधिकरणाने जुलै २०२५ मध्ये राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवला.परत याविरोधात पात्र उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.त्यानुसार उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद व अयोग्य असल्याचे निरीक्षण नोंदवत झालेली निवड प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.प्रकरणी न्यायलयाने मॅटच्या आदेशावर शिक्कामोर्तब करत उमेदवारांच्या याचिका धुडकावून लावल्या.मुलाखत घेणाऱ्या समितीची नियुक्ती शासकीय नियमांनुसार झाली नव्हती,असेही निरीक्षण उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे.समितीत उपविभागीय अधिकारी,पोलिस उपविभागीय अधिकारी, समाज कल्याण अधिकारी,आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि तहसीलदार असायला हवे होते.मात्र,त्यांच्या जागी त्यांच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या.अशा प्रातिनिधिक नियुक्त्या कायद्याने मान्य होत नाहीत, असे न्यायालयाने नमूद करत मुलाखत प्रक्रियेतील गुणांकनातही गोंधळ आढळला.काही समिती सदस्यांनी उमेदवारांना संख्येने गुण दिले,तर काहींना *(स्टार)चिन्हाने दिले.मुलाखती फक्त १ ते ३ मिनिटांत संपवण्यात आल्या.विशेषतः सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये आवाजही नव्हता,असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले व भंडारा जिल्ह्यात २०२३ साली झालेली पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया रद्दबातल केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!