Thursday, April 30, 2026
Homeएटापल्लीजल जीवन मिशन अंतर्गत जारावंडी येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन- माजी...

जल जीवन मिशन अंतर्गत जारावंडी येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन- माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

एटापल्ली :- ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळावे;या हेतूने शासनाच्या वतीने जलजीवन मिशन योजना हाती घेण्यात आली आहे.  योजनेचा लाभ देण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावाची निवड करण्यात आली असून नुकतेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.सदर योजनेमुळे नागरिकांचा पाण्याचा खर्च कमी होणार असून स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळणार आहे.

 उद्घाटन प्रसंगी बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत नळाद्वारे पाणी येणार आहे.परंतु पाणी जपून वापरणे ही काळाची गरज आहे.पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचे नियोजन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे असे आवाहन केले.

३८ लाख १७ हजार २४६ रुपयांच्या निधीतून जारावंडी येथे जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा काम पूर्ण केले जाणार आहे.याप्रसंगी माजी पं. स.सभापती बेबीताई नरोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली शहराध्यक्षा पौर्णिमा श्रीरामवार,सचिव सुमन दुर्वा,सरपंच सपना कोडापे,येमली चे सरपंच ललिता मडावी,माजी नगरसेविका सगुणा कांदो,जारावंडी येथील उपसरपंच, सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!