- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यात तब्बल १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार शासनाच्या वतीने याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.अश्यातच आता आज,बुधवार २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती बाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.त्यानुसार पोलिस शिपाई-१२ हजार ३९९ पदे, पोलिस शिपाई चालक-२३४ पदे,बॅण्डस्मन-२५ पदे,
सशस्त्र पोलिस शिपाई-२ हजार ३९३ पदे आणि कारागृह शिपाई-५८० पदे,असे एकूण १५ हजार ६३१ पदांच्या भरतीला शासनाच्या वतीने हिरवा कंदील देण्यात आला आहे.राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे शंभर टक्के भरण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.पोलिस भरती प्रकियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता ४५० रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.
- Advertisement -

