- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-भामरागड तालुक्याच्या पर्लकोटा नदीच्या पुरामुळे मागील चार दिवसांपासून अडकून पडलेल्या चार विद्यार्थ्यांना अखेर प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांमुळे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.सदरचे विद्यार्थी दिल्ली येथे येत्या,२३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या केंद्र सरकारच्या दिल्ली सबऑर्डीनेट सर्व्हिसेस सीलेक्शन बोर्ड(DSSSB)विभागाच्या परीक्षेसाठी जाणार होते.
पुराच्या पाण्यामुळे भामरागड शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आज,बुधवार २० ऑगस्ट रोजी विशेष मोहिम राबवून एसडीआरएफ टीमच्या मदतीने बोटीद्वारे पर्लकोटा नदी पार करून हेमलकसा येथे पोहोचविण्यात आले.यानंतर त्यांना पुढे दिल्लीच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन तहसील प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार महसूल प्रशासन,नगरपंचायत भामरागड तसेच एचडीएफ टीमने समन्वय साधून ही मोहिम यशस्वी केली.
- Advertisement -

