Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पिएम किसान योजनेच्या २ हजार रुपयांची प्रतीक्षा संपली..!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पिएम किसान योजनेच्या २ हजार रुपयांची प्रतीक्षा संपली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता येत्या,शनिवार २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केला जाणार असल्याचे केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज,गुरुवार ३१ जुलै रोजी उच्चस्तरीय बैठक पार पडली.या बैठकीत २ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.बैठकीस देशभरातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम  किसान  योजनेचा मागील १९ वा हप्ता हा २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमातून जारी केला होता.त्यातच आता जून,जुलै महिना संपूनही दोन हजार जमा झाले नसल्याने शेतकरी संभ्रमात होते. त्यानुसार आता येत्या २ ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.यात ९.७ कोटी शेतकऱ्यांना सुमारे २० हजार ५०० कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!