Wednesday, April 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबस कंडक्टरने १ रुपया परत दिला नाही म्हणून गेला ग्राहक तक्रार मंचात;...

बस कंडक्टरने १ रुपया परत दिला नाही म्हणून गेला ग्राहक तक्रार मंचात; मिळाली एवढी रक्कम…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- बसमध्ये कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशांवरुन वाद झाला नसेल असा एकही माणूस शोधून सापडणार नाही.जो जो बसने प्रवास करतो; त्याच्यासोबत कधी ना कधी असा वादाचा प्रसंग घडला असेलच.असे वाद झाल्यानंतर शक्यतो प्रवाशी वाद आटोपता घेतात. काहीजण वरचे सुट्टे पैसे सोडून देतात.दुकानात देखील खरेदी दरम्यान सुट्टे पैसे नसले तर दुकानदार आपल्याला नको असलेले चॉकलेट जबरदस्ती गळ्यात मारतो.बंगळुरुमध्ये एका बसमध्ये सुट्ट्या पैशांवरुन असाच एक वाद झाला.पण प्रवाशी इतका चिवट निघाला की,त्याने थेट ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.न्यायालयाने देखील या प्रवाशाची मागणी ऐकून घेत त्याला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे सदर प्रवाशाला एक रुपयांच्या बदल्यात हजारो रुपयांची नुकसान भरपाई मिळाली.

२०१९ साली रमेश नाइक हे बीएमटीसी (Bangalore Metropolitan Transport Corporation) च्या बसने प्रवास करत होते. शांतीनगर ते मॅजेस्टीक बस डेपोपर्यंत जाण्यासाठी नाइक यांनी तिकीट काढले. तिकीटाचा दर २९ रुपये एवढा होता. नाइक यांनी कंडक्टरला तीन रुपये दिले. मात्र वरचा एक रुपया कंडक्टरकडून नाइक यांना मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या नाइक यांनी थेट जिल्हा ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

ग्राहक न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. नाइक यांनी एक रुपयाच्या बदल्यात १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मागितली.त्यानंतर न्यायालयाने आदेश दिला की, बीएमटीसीने नाइक यांना दोन हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच तक्रारदाराचे कायदेशीर प्रक्रीयेसाठी खर्च झालेले १ हजार रुपयेही देण्यात यावेत. यामुळे नाइक यांना एक रुपयांच्या बदल्यात तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!