उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण होत असतांनाच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.आज,सोमवार १४ एप्रिल ते १७ एप्रिल असे चार दिवस पंधरा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल,असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही ठिकाणी काल रविवारी उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला आहे.कारण राज्यातील बहुतांश भागांत ढग दाटून गार वारे सुटल्याने काहीकाळ बरे वाटले.गत १२ तासांत वातावरणात बदल झाला. कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी घट झाली.त्यामुळे बहुतांश भागातील कमाल तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशावरून ३५ ते ३८ अंशावर खाली आला आहे.त्यातच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचे १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिले आहे.यात चंद्रपूर,वर्धा, यवतमाळ,जळगाव,छत्रपती संभाजीनगर,पुणे, कोल्हापूर, सांगली,सोलापूर,रायगड,रत्नागिरी,नांदेड,लातूर,धाराशिव,अमरावती इत्यादी जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस पावसाचे यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
आजपासून पंधरा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

