Sunday, September 6, 2026
Homeगोंदियादोन घोट चहा ठरला पोलीस जवानांसाठी घातक- नक्षल्यांच्या बेधुंद गोळीबारात दोन पोलीस...

दोन घोट चहा ठरला पोलीस जवानांसाठी घातक- नक्षल्यांच्या बेधुंद गोळीबारात दोन पोलीस जवान शहीत तर एक जखमी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील राज्याचा पूर्व टोक असलेल्या चांदसूरज गावापासून छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे.जवळच असलेल्या बोरतलाव येथे छत्तीसगड पोलिसांची चौकी आहे. नक्षलभाग असल्यामुळे छत्तीसगड पोलिस सतर्क असतात.रात्रभर ड्युटी करून रात्रीचा त्राण झटकण्यासाठी बोरतलाव चौकीचे तीन पोलिस जवान महाराष्ट्रातील चांदसुरज येथील ढाब्यावर चहा पिण्याकरिता गेले.चहा पिऊन परत जाताना रस्त्याच्या कडेला थांबले.सकाळी साडेआठची वेळ असल्याने आणि जवळच आले असल्याने त्यांनी सोबत शस्त्र नेले नव्हते.दरम्यान रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांना पोलिस जवान दिसताच त्यांनी बेधुंद गोळीबार करणे सुरू केले.पोलिस जवानांना काही कळण्याच्या आतच त्यांना बंदुकीच्या गोळ्या शरीर छेदून गेल्या.यात राजेश प्रतापसिंग आणि ललीत यादव या दोन पोलिस जवानांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.तर जखमी अवस्थेत एक जवान तिथून जीव वाचवून पळाला.नक्षल्यांनी हत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकीला देखील आग लावली.सीमावर्ती भागातील चळवळ संपुष्टात आल्याची अपेक्षा व्यक्त करत असतानाच ही घटना घडल्यामुळे नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.पोलिस जवानांची थोडीशी बेपर्वाई त्यांच्या जीवावर बेतली आहे.

महामार्गापासून २० फुटांवरील घटना

चांदसूरज हे गाव महाराष्ट्रात तर बोरतलाव हे गाव छत्तीसगड राज्यात आहे.दोन्ही गावांतील अंतर एक ते दीड किलोमीटर,बोरतलाव येथे चांगले दुकान नसल्याने तिनही जवान चांदसुरज नजीक असलेल्या ढाब्यावर सकाळी चहा पिण्याकरिता गेले होते.हा मार्ग दोन राज्यांना जोडणारा पक्का रस्ता आहे.रस्त्याच्या कडेला उभे राहून तिन्ही जवान बोलत असतांना आणि रहदारी सुरू असतांनाच रस्त्यापासून अगदी २० फूट अंतरावरच ही घटना घडली.त्यामुळे नक्षलवादी आधीच दबा धरून बसले होते.की त्यांना त्याची माहिती कुणीतरी पुरविली, हे तपासाअंती समोर येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!