Monday, May 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार तर एका जवानाला वीरगती...

नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार तर एका जवानाला वीरगती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगड राज्याच्या काही भागात नक्षली मोठ्या प्रमाणावर उपद्रव माजवित आहेत.दोन दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफच्या चमूने संयुक्त कारवाई करीत ३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याच्या इंदागाव ठाणा क्षेत्राच्या सोरनामाल जंगल परिसरात पोलिस-नक्षल चकमक झाली होती. जवानांनी मोठा फौजफाटा घेऊन नक्षल्यांना हुसकावून लावत नक्षल्यांच्या शोध मोहिमेसाठी ३०० जवान रात्री उशिरा बाहेर पडले होते.त्यातच डीआरजी,एसटीएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनी तीन नक्षल्यांना ठार केले होते.अशातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे; छत्तीसगडमधील अबुजमाडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे.चकमकीत ४ नक्षलवादी ठार झाले असून एका जवानाला वीरगती प्राप्त झाली आहे. घटनास्थळावरून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.त्यामध्ये एके-४७ रायफलसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.अबुजमाडमध्ये नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!