Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीतृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रार निवारण समितीवर सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रार निवारण समितीवर सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिस-या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे.तृतीयपंथी,ट्रान्सजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असुन; या घटकास समाजाकडुन सापत्न व भेद भावाची वागणुक दिली जाते.नेहमीच भेदभाव,

सापत्न वागणुकी मुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासुन दुर्लक्षित राहिलेले आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासना मार्फत मुलभुत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-२०१८ प्र.क्र.२६/सामासु दि. ०७ ऑक्टोंबर २०२० अन्वये जिल्हयातील तृतीयपंथीय यांच्या तक्रारीचे,समस्यांचे जिल्हास्तरावर तक्रार निवारण होणे आवश्यक आहे. या करीता जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे.सदर जिल्हास्तरीय समितीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्तीची नेमणुक करावयाची आहे. 

यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणा-या इच्छुक संबंधित व्यक्तीनी २७ फेब्रुवारी २०२३ पर्यत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय समितीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती सदस्यांची नव्याने समावेश करुन समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.त्याकरीता सामाजिक क्षेत्रात काम करणा-या इच्छुक व्यक्तींनी, गडचिरोली जिल्हातील संबंधीत व्यक्तीनी सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण गडचिरोली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल.आय.सी. ऑफिस रोड आयटीआय चौक,गडचिरोली-४४२६०५ या पत्त्यावर किंवा कार्यालयाचा संपर्क क्र.०७१३२ -२२२१९२ वर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे .

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!