Wednesday, July 15, 2026
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील नांदी येथील रहिवासी असलेल्या वीज ग्राहकाला लोक न्यायलयाने दिलासा देत वादग्रस्त वीज बिल पाठविणाऱ्या महावितरण कंपनीला पीडित ग्राहकास ३ हजार रुपयांची भरपाई मंजूर करत वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले.माणिक हुळके,असे दिलासा मिळालेल्या ग्राहकाचे नाव आहे.
विद्युत वितरण कंपनीने माणिक हुळके यांना ऑगस्ट व नोव्हेंबर-२००६ मध्ये अवाक्याबाहेर वीज बिल पाठविले होते.हुळके यांनी त्यावर आक्षेप घेऊन वीज मीटर तपासण्याची मागणी केली होती.त्याकरिता शुल्कही जमा केले होते.परंतु,महावितरण कंपनीने मीटर तपासणी केली नाही.उलट फेब्रुवारी-२००७ मध्ये हुळके यांचा वीजपुरवठा खंडित केला.त्यानंतर महावितरणने १ नोव्हेंबर २०२४ रोजी हुळके यांना १ लाख ७ हजार ५९० रुपये वीज बिल वसुलीची नोटीस बजावली.त्याविरुद्ध हुळके यांनी स्थायी लोकन्यायालयात तक्रार दाखल केली होती. दरम्यान,न्यायालयाने सुरुवातीला हा वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न केला.पण,त्यात यश मिळाले नाही.परिणामी,गुणवत्तेच्या आधारावर न्यायालयाचे अध्यक्ष दीपक भेंडे व सदस्य प्रतिभा अनकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.सुनावणी करून  माणिक हुळके यांना भरपाईसह वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!