Saturday, May 2, 2026
Homeउत्तरप्रदेश८० वर्षीय वृद्धाने कोट्यवधी रुपयांची संपत्ती केली दान - मुलाला घडविली अद्दल;...

८० वर्षीय वृद्धाने कोट्यवधी रुपयांची संपत्ती केली दान – मुलाला घडविली अद्दल; वारसांनाही संपत्तीतून केले बेदखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

उत्तर प्रदेश:- स्वतःच्या बेजबाबदार मुलांमुळे मन दुखावलेल्या एका ८० वर्षीय वृद्धाने आपली कोट्यवधी रुपयांची संपत्ती उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या नावे केली आहे.वृद्धाने आपल्या अंत्यसंस्कारालाही मुलांनी हजर राहू नये; अशी इच्छा आपल्या मृत्युपत्रात म्हटले आहे.उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरात ही घटना घडली आहे. मुजफ्फरनगरच्या बुढाना तालुक्यातील बिराल गावात ८० वर्षीय तत्थू सिंह यांचे कुटुंब राहते.त्यांच्या पत्नीचा २० वर्षांपूर्वी मृत्यू झाला.नत्थू सिंह यांनी आपली दोन्ही मुले व ४ मुलींचे लग्न लावून दिले.त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा मुलगा सहारनपूरमध्ये सरकारी शिक्षक आहे.५ महिन्यांपूर्वी नत्थू सिंह यांना नाईलाजाने वृद्धाश्रमात जावे लागले. कारण,त्यांना एकवेळचे जेवणही मिळत नव्हते.मुलगा व सुनेच्या व्यवहारामुळे दुखावलेल्या नत्थू सिंह यांनी सांगितले की, ते स्वतः स्वयंपाक करून उदरनिर्वाह करत होते.यामुळे त्यांनी आपली कोट्यवधी रुपयांची जवळपास १८ बीघा जमीन राज्यपालांच्या नावे केली आहे.त्यांनी आपल्या मुलालाही संपत्तीतून बेदखल केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!