- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल गुरुवारी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सुरक्षा दलाने १२ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठविले आहे.बिजापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जंगलात सुरक्षा दलाने केलेल्या नक्षलवादविरोधी कारवाईदरम्यान ही घटना घडली.कारवाईत जिल्हा राखीव दलाचे तीन जिल्ह्यांतील जवान, सीआरपीएफच्या कोब्रा विंगच्या पाच बटालियन तसेच २२९व्या बटालियनचे जवान सहभागी झाले होते.चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करून पुन्हा त्या भागात नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.चकमकीमध्ये सुरक्षा दलाची कोणतीही हानी झालेली नाही.
बस्तरचे आयजी सुंदरराज पी.यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.विजापूर,डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा,कोब्राच्या वेगवेगळ्या बटालियन आणि सुमारे १२०० ते १५०० सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे.काही बडे नक्षलवादी नेते जंगलात आहेत.विजापूरमध्येच आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत.
- Advertisement -

