Thursday, April 16, 2026
Homeनागपूर७८ वर्षीय आजोबा ३० वर्षीय विवाहितेच्या प्रेमात.. -प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा आजोबाने...

७८ वर्षीय आजोबा ३० वर्षीय विवाहितेच्या प्रेमात.. -प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा आजोबाने काढला काटा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या गायमुख पर्यटनस्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या नरखेड तालुक्यात अजब प्रेमाची गजब धक्कादायक कहाणी उघडकीस आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागला आहे.विशेष म्हणजे,नातू-पतू,सून बोवा असलेल्या एका ७८ वर्षीय आजोबाने प्रेमात अडसर ठरणाऱ्या ३० वर्षीय प्रेमिकाच्या ३४ वर्षीय पतीचा काटा काढण्याचे ठरवून शेतशिवारात दुपट्ट्याने गळा आवळून खून केला असल्याची घटना काल मंगळवारी नरखेड पोलीस तपासात उघडकीस आली आहे.प्रकरणात आजोबा प्रियकर व तरुण प्रेयसीला नरखेड पोलिसांनी अटक करून भारतीय न्याय संहिता (बीएनएस)कलम १०३(१),३(५) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.शिवशंकर गणुजी धुर्वे वय ३४ वर्षे असे मृताचे नाव आहे.तर आरोपींमध्ये शांताराम पुरणसिंग दिदावत वय ७८ वर्षे व त्याची प्रेयसी म्हणजेच शिवशंकरच्या ३० वर्षीय पत्नीचा समावेश आहे.हे तिघेही रा.बेलोना,ता. नरखेड,जि.नागपूर येथील रहिवासी आहेत.
अधिक माहिती अशी की, ७८ वर्षीय आजोबा आरोपी शांताराम दिदावत हा भाजप पदाधिकारी उकेश चव्हाण यांच्याकडे दिवाणजी म्हणून,तर शिवशंकर धुर्वे सालगडी म्हणून काम करायचा.शिवशंकर त्याच्या पत्नीसोबत उकेश चव्हाण यांच्या गंगालडोह शिवारातील शेतात राहायचा.दोघेही एकाच मालकाकडे कामाला असल्याने त्यांची आपसात ओळख होती.त्यातच शांताराम व शिवशंकरच्या पत्नीचे आपसात सूत जुळले.दोघेही शरीरसंबंध करीत असतांना शिवशंकरने चारदा प्रत्यक्ष बघितले होते.तो आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याचे शांतारामला वाटत असल्याने त्याने शिवशंकरला संपविण्याची योजना आखली.त्यानुसार शांतारामने रविवारी शिवशंकरला गायमुख शिवारातील शेतात नांगरणी करण्यासाठी पाठविले.भाजप पदाधिकारी उकेश चव्हाण यांची गायमुख (ता.नरखेड) शिवारात शेती आहे.दुपारी शिवशंकरची पत्नी त्याच्या जेवणाचा डब्बा घेऊन शेतात गेली.तिच्या मागे शांताराम शेतात पोहोचला.त्याने शिवशंकरचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला व घरी परत आला.त्यानंतर त्याने मयूर बावणे यास शिवशंकर शेतात दारू पिऊन पडून असेल.त्याला बैलगाडीत टाकून घेऊन ये,अशी सूचना केली.त्यानुसार मयूर बावणे शेतात गेला असता शिवशंकर हा निपचित पडून होता.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. त्याचा मृत्यू गुदमरून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होताच पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली.त्यांना आरोपी आजोबा आणि विवाहित तरुणी या दोघांची प्रेमकथा कळताच त्यांनी दोघांना ताब्यात घेतले व अवघ्या दोनच दिवसांत हत्येचे बिंग फुटले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

सूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. – गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपळू लागला आहे.सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे.राज्यात पुढील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!