Saturday, June 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त"३५० रुपयाच्या खताच्या बॅगचे ४९० रुपये घेतलेच कसे?" असे म्हणत जिल्हा ग्राहक...

“३५० रुपयाच्या खताच्या बॅगचे ४९० रुपये घेतलेच कसे?” असे म्हणत जिल्हा ग्राहक मंचात घेतली धाव.. – कृषी केंद्र चालकाला घडवली अद्दल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखादा दुकान,हॉटेल वा एखाद्या आस्थापनामधील वस्तू प्रिंट रेटनुसार न विकता जादा दराने विकली जाते,तरीही काहीजण मुकाट्याने खरेदी करून आपल्या अधिकारावर गदा आणतांना दिसून येतात.मात्र,सदरच्या प्रकरणात एका शेतकऱ्याने “३५० रुपयाच्या खताच्या बॅगचे ४९० रुपये घेतलेच कसे?” असे म्हणत जिल्हा ग्राहक मंचात धाव घेत कृषी केंद्र चालकाला अद्दल घडवली आहे.प्रकरणी यवतमाळ जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र उल्हास मराठे यांनी शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय देत प्रिंट रेटनुसार जादा घेतलेले १४० रुपये ११ ऑक्टोंबर २०२२ पासून १० टक्के व्याजासह तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल १० हजार आणि तक्रार खर्चाचे ५ हजार रुपये द्यावे,असा आदेश कृषी केंद्राला दिला आहे.
  • प्रकरण काय?👇
यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी(तालुका)येथील शेतकरी दिगांबर विठ्ठलराव होडगीर यांनी शहरातील निलावार कृषी केंद्रातून आरसी फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड लखमापूर(नाशिक)निर्मित गोदावरी नामक सुपर फॉस्फेटची एक खताची बॅग ४९० रुपयांना खरेदी केली होती.कृषी केंद्राने त्यांना तेवढ्या रकमेची पावतीही दिली.बॅग रिकामी झाल्यावर होडगीर यांना खताच्या बॅगवर एमआरपी ३५० रुपये असल्याचे लक्षात आले.३५० रुपयाची खताची बॅग ४९० रुपयाला विकली, म्हणजेच १४० रुपये जास्तीचे घेण्यात आले.त्यामुळे, जास्तीचे घेतलेले १४० रुपये परत मिळावे,यासाठी शेतकऱ्याने निलावार कृषी केंद्राशी संपर्क करून जास्त घेतलेली रक्कम परत करा; असे म्हटले.परंतु कृषी केंद्र चालकाने रक्कम परत करण्यास नकार दिला.कृषी केंद्राकडून रक्कम परत मिळण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी दिगांबर होडगीर यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली.मंचाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर मंगळवार २० जानेवारी २०२६ रोजी सुनावणी झाली.यामध्ये कृषी केंद्राने होडगीर यांच्याकडून खताच्या बॅगवर १४० रुपये जास्तीचे घेतले.शिवाय,ते परत देण्यासही नकारात्मक भूमिका घेतल्याचे सिद्ध झाल्याने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय देण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!