Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीसततच्या नापिकीमुळे शेतकरी बांधवांनी शेती विकण्याकडे वाढविला कल...- लागत खर्च जास्त तर...

सततच्या नापिकीमुळे शेतकरी बांधवांनी शेती विकण्याकडे वाढविला कल…- लागत खर्च जास्त तर उत्पन्न कमी असल्याचे कारण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-देसाईगंज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्गांनी शेतीच्या सततच्या नापिकीमुळे कंटाळून शेती विकण्याचा सपाटा लावला आहे.शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये काही राम नाही म्हणून कोट्यवधी व लाखो रुपयास शेत्या विकण्यास सुरुवात केली आहे.

शेतीमधून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न होत नसल्याने लागत खर्च जास्त व उपन्न कमी यामुळे कंटाळुन खाजगी शेती विकत घेणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्या खरेदीदारांना शेती विकण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी बांधवांचे नशिबी कधी जास्तीचा पाऊस तर कधी कमी पाऊस,कधी महापूर तर कधी नापिकी,कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी पिकांची नासाडी,कधी बँकांचे कर्जाचे डोंगर तर कधी पैस्यांची कमतरता अशी बरीच प्रश्ने शेतकरी बांधवाना नेहमी भेडसावत असतात. 

त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे कशी सोडवावी असाही प्रश्न शेतकरी बांधवांना सतत भेडसावत असतो.शासन स्तरावरून शेतकऱ्यांची प्रश्ने सोडवायला वेळच नाही.शेतकरी बांधवांचे समस्यांचे निराकरण करण्यास कुणाकडे वेळच उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होऊन शेती विकण्याकडे वळलेला दिसतो.भविष्यात शेत्या दिसणार की नाही?असा विचार मनात घर करून सोडत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!