Friday, May 29, 2026
Homeगडचिरोलीसततच्या नापिकीमुळे शेतकरी बांधवांनी शेती विकण्याकडे वाढविला कल...- लागत खर्च जास्त तर...

सततच्या नापिकीमुळे शेतकरी बांधवांनी शेती विकण्याकडे वाढविला कल…- लागत खर्च जास्त तर उत्पन्न कमी असल्याचे कारण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-देसाईगंज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्गांनी शेतीच्या सततच्या नापिकीमुळे कंटाळून शेती विकण्याचा सपाटा लावला आहे.शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये काही राम नाही म्हणून कोट्यवधी व लाखो रुपयास शेत्या विकण्यास सुरुवात केली आहे.

शेतीमधून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न होत नसल्याने लागत खर्च जास्त व उपन्न कमी यामुळे कंटाळुन खाजगी शेती विकत घेणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्या खरेदीदारांना शेती विकण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी बांधवांचे नशिबी कधी जास्तीचा पाऊस तर कधी कमी पाऊस,कधी महापूर तर कधी नापिकी,कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी पिकांची नासाडी,कधी बँकांचे कर्जाचे डोंगर तर कधी पैस्यांची कमतरता अशी बरीच प्रश्ने शेतकरी बांधवाना नेहमी भेडसावत असतात. 

त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे कशी सोडवावी असाही प्रश्न शेतकरी बांधवांना सतत भेडसावत असतो.शासन स्तरावरून शेतकऱ्यांची प्रश्ने सोडवायला वेळच नाही.शेतकरी बांधवांचे समस्यांचे निराकरण करण्यास कुणाकडे वेळच उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होऊन शेती विकण्याकडे वळलेला दिसतो.भविष्यात शेत्या दिसणार की नाही?असा विचार मनात घर करून सोडत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आंघोळीसाठी गेलेल्या तीन जणांचा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील वणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, शुक्रवार २९ मे रोजी...

कुरुडच्या बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात; देसाईगंज महसूल विभाग कोमात..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या...

अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा दिली; मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे.. – पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला...

साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा.. – तुमच्या परवानगीशिवाय मिटर बदलताच येत नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात वीज वितरण कंपनीने मागील काही महिन्यांपासून साध्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.मात्र,वीज वितरण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!