Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीसंत्रानगरीत चुडाराम बल्हारपुरे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने सन्मानित.. 'गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव...

संत्रानगरीत चुडाराम बल्हारपुरे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने सन्मानित.. ‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या महानाट्यास साहित्य अर्चन मंच पुरस्कार प्रदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-देशात संत्रानगरी म्हणून प्रसिद्ध आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या मोरभवन येथील ‘विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या अर्पण सभागृहात साहित्य अर्चन मंच,नागपूरच्या वतीने नुकतेच झाडीपट्टीतील नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
साहित्य अर्चन मंच,नागपूर या संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते.यात पाच विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांना त्यांच्या सामाजिक सेवेबद्दल तसेच २० हिंदी आणि मराठी साहित्यिकांना उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी पुरस्कृत करण्यात येते व विजेत्या साहित्यिकांना वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.राष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी संपूर्ण भारत देशातून १६३ साहित्यिक यांनी सहभाग नोंदविला होता.त्यात मराठी साहित्य प्रकारात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित ‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाटकास यंदाचा नाट्यलेखनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हिंदी साहित्य संघात झालेल्या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गोविंदप्रसाद उपाध्याय(आयुर्वेदाचार्य तथा संपादक पावन परम्परा, डॉ.वेदप्रकाश मिश्रा(माजी कुलपती,श्रीकृष्ण स्वास्थ्य विश्वविद्यालय,कराड),श्री स्वामी निर्मलानंद महाराज (अध्यक्ष,गीता मंदिर, नागपूर)व विशेष अतिथी प्रा.डॉ.प्रमोद गिरी(संचालक,न्युरान हॉस्पिटल),डॉ.विवेक लंजे(प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ)यांचे हस्ते साहित्य अर्चन मंचचे अध्यक्ष डॉ.शशिकांत शर्मा व सचिव नरेंद्र परिहार ‘एकांत’ इ.मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र व सन्मानपत्र असे आहे.नुकताच चंद्रपूर येथील प्रियदर्शनी हॉल मध्ये राष्ट्रीय आदिवासी नाट्य महोत्सवात या नाटकाचा प्रयोग सादर झालेला आहे.
चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाचा सन १९९३ चा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आजपर्यंत त्यांची विविध १५ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत.
महामृत्युंजय मार्कंडेश्वर,महापूजा,बहूढंगी समाधीवाले बाबा,स्पेशल रिपोर्ट,धरती आबा:क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,यादव गव्हाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा. डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा.डॉ.योगीराज नगराळे,नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,डॉ.दिपक चौधरी,रमेश निखारे,प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक) मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर(प्रकाशक)सह इतर साहित्यिक तथा कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!