Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीशेतकरी बांधव मेटाकुटीस; वीजबिल भरणा करावा की कर्जफेड करावी?

शेतकरी बांधव मेटाकुटीस; वीजबिल भरणा करावा की कर्जफेड करावी?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- सध्याच्या घडीला शेतकरी बांधवांपुढे मोठे अस्मानी संकट निर्माण झाले आहे.अशातच इकडे आड तिकडे विहीर काहीशी अशीच स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे. नेहमीच्या कीट-किटीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.मार्च एंडिंगच्या तडाख्यात शेतीसाठी उचल केलेल्या कर्जाची परतफेड तर आवाक्याबाहेरचे घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल अशी दुधारी तलवार सध्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर कायम आहे.त्यामुळे कर्जाची परतफेड करायची की वीजबिल भरायचे? असा दुहेरी प्रश्न शेतकऱ्यांपुढे आवासून उभा आहे. बहुतांश शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला कर्ज घेऊन आपल्या शेतमशागतीच्या कामाला लागतात. आपल्या शेतातून अधिकाधिक उत्पन्न व काढून कर्जाची परतफेड करून वर्षभर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी शेतकरी शेतात जीव वे पणाला लावून राबतो.मात्र,मागील हंगामापासून शेतकऱ्यांपुढे मोठे आवाहनच उभे झाले.कोरोना लॉकडाऊन काळात मजूरांची वानवा त्यातही अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने उत्पादनात घट या सर्व विवंचनेतून शेतकरी उठण्याच्या प्रयत्नात असतांना आता सुलतानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले. एकीकडे ऐन तोंडावर येऊन ठेपलेल्या मार्च एंडिंगच्या तडाख्यात बँकांकडून शेतकऱ्यांनी उचल केलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावला जात असताना दुसरीकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल तत्काळ भरा; अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यासंबंधाने बजावले जात आहे.अशा आर्थिक अडचणीच्या प्रसंगी शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करायची? की आवाक्याबाहेरचे घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल भरायचे? की वर्षभर कुटुंबाचे गुजराण करायचे? असा मोठे केविलवाणा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा येऊन ठाकला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!