Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तव्हायरल व्हिडिओ; भारताचा पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक' चा प्रहार...

व्हायरल व्हिडिओ; भारताचा पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’ चा प्रहार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पाकिस्तान सुधरण्याचे नाव घेत नसल्याने भारताकडून दे धक्के सुरू आहेत.अश्यात आता भारताने चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले.या धरणातून आतापर्यंत पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्यात आले होते.सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते.आता पुन्हा सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.भारताने सलाल आणि बगलिहार धरणातून पाणी सोडल्याने पाकिस्तानात महापूराचे संकट निर्माण झाले आहे.जोरदार पावसामुळे भारताने रामवन येथील बगलिहार धरणाचा एक दरवाजा उघडला आहे.भारताने स्पष्ट केले की सिंधू जल करार स्थगित झालेला आहे.त्यामुळे आता या धरणांमधून किती पाणी सोडायचे हा निर्णय भारताच्या हातात आहे.भारतानं यापूर्वी चिनाब नदीतील पाणी रोखले होते.आता दरवाजा उघडल्याने पाणी पाकिस्तानात पोहोचेल.पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करून निष्पाप पर्यटकांचे बळी घेतले होते. त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारत सरकारने सिंधू जल करार स्थगित केला होता आणि सिंधू नदीचे पाणी रोखले होते.यानंतर पाकिस्तानने थयथयाट करत भारताने आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन केले असल्याचा कांगावा केला होता; पण त्याला भारत सरकारने केराची टोपली दाखवली होती आणि दहशतवादाची कदापि गय केली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते.पाणी सोडताच नदी परिसरात वाळू उपश्यासाठी ठेवण्यात आलेले साहित्य वाहून जातांनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!