Wednesday, August 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण..

पाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-निर्दयी पाकिस्तान निष्पाप लोकांचे जीव घेऊन साध्य काय करते? हेच कळेनासे झाले आहे.दहशतवाद्यांना पाठीशी धरून,हातात बांगड्या घालून स्वतःला पाकिस्तान मोठा हुशार समजू लागला आहे.सध्या स्थितीत ‘अक्कल बडी की भैस’ अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.अशातच पाकिस्तान सुधरण्याचे नावच घेत नसल्याने भारताने चोख प्रत्युत्तर देत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे.भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे  नष्ट केले.त्यामुळे भांबरेजलेला पाकिस्तान मिसाइल-ड्रोनने भारतावर हल्ले करत आहे; दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी जवान सीमेलगतच्या भागात गोळीबार करत आहेत.त्यातच आज,शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणारे जवान मुरली नाईक शहीद झाले.पण पाच शत्रूंना यमसदनी पाठवत जवानास वीरमरण आले.काश्मीर सीमेवर पहाटे तीनच्या सुमारास अचानक सुरु झालेल्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला.तेव्हा जवान मुरली नायक यांनी अतुलनीय धैर्य दाखवत पाच जणांचा खात्मा केला.शत्रूशी झुंज देतांना मुरली नायक यांना वीरमरण आले.जवान मुरली नाईक यांचे मूळ गाव आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्की तांडा असून हल्ली मुंबईच्या घाटकोपर येथील कामराजनगर येथे वास्तव्याला होते.नाईक यांचे कुटुंबीय २ मे ला त्यांच्या मूळ गावी गेले असल्याने शहीद जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवावर उद्याला मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!