Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीवैयक्तिक तक्रारी थेट जिल्हास्तरावर मांडण्याची संधी..!

वैयक्तिक तक्रारी थेट जिल्हास्तरावर मांडण्याची संधी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हास्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,बुधवार ४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात करण्यात येणार आहे.लोकशाही दिन हा नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक तक्रारी थेट जिल्हास्तरावर मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक व्हावा तसेच प्रलंबित तक्रारींवर त्वरित कार्यवाही व्हावी,या उद्देशाने दर महिन्याला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
ज्या तक्रारदारांना जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा आहे,त्यांनी संबंधित तक्रार प्रथम तालुका स्तरावरील लोकशाही दिनात मांडलेली असणे आवश्यक आहे.तालुका स्तरावर तक्रारीचे निराकरण होऊन प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यासच संबंधित तक्रारदारास जिल्हास्तरावर अर्ज सादर करता येईल. अर्जासोबत तहसिलदारांच्या उत्तराची प्रत तसेच तालुका लोकशाही दिनाच्या टोकन क्रमांकाची प्रत जोडणे आवश्यक आहे.
सदर अर्ज विहित नमुना प्रपत्र १ (ब) मध्ये भरून अर्जाची आगाऊ प्रत जोडून सादर करावे.तसेच तक्रार किंवा निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक असून अन्य प्रकारचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शासनाने निर्धारित केलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून लोकशाही दिनाच्या माध्यमातून त्यांच्या तक्रारींवर तातडीने व प्रभावी कार्यवाही करता येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!