- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-हल्ली मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे बांधकाम सुरू असल्याने काहीजण वीटभट्टीचा व्यवसाय करून वा घरच्या बांधकामासाठी वीटभट्टी लावून गरज भासवतांना दिसून येतात.विशेष म्हणजे,वीटभट्टीचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी महसूल विभागाकडून माती तसेच इतर परवानगी पूर्ण करून परवाना घेणे आवश्यक असल्याने एका ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी कर्मचारीने वीटभट्टीचा परवाना देण्यासाठी लाचेची मागणी केली. दरम्यान,तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली आणि तलाठीच्या घराजवळच रक्कम घेतांना रंगेहाथ पकडले.गायत्री बोरकर वय ३८ वर्षे असे एसीबीने पकडलेल्या महिला कर्मचारीचे नाव असून सदरची कारवाई ही काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे करण्यात आली.
यातील तक्रारदार यांचा अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या अरततोंडी गाव परिसरात वीटभट्टीचा व्यवसाय सुरू आहे.वीटभट्टीचा व्यवसाय सुरू असतांनाच तलाठी गायत्री बोरकर ह्या रविवार २२ मार्च रोजी तक्रारदारांच्या वीटभट्टीवर जाऊन ‘तुमचा परवाना कुठाय?’ परवाना नसल्याने तुमच्यावर अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची धमकी दिली.प्रसंगी तक्रारदार घाबरले असता परवाना नसल्याने दहा हजार रुपयांची मागणी बोरकर यांनी तक्रारदारास केली. प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी अंती गायत्री बोरकर यांना दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
- Advertisement -

