- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ ला तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पार पडल्या होत्या.परीक्षा संपल्याने विद्यार्थी तथा पालकांना परीक्षांच्या निकालाची प्रतिक्षा होती.अशातच आता राज्यभरातील विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पुढील मे महिन्याच्या १३ तारखेला लागणार आहे.तर दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल १५ किंवा १६ मे ला जाहीर होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत राज्याचे शिक्षणमंत्री करणार आहेत.
- Advertisement -

