- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शेतात कामे करीत असतांनाच अचानकपणे वाघाने हल्ला चढवला.हल्ला चढवताच जिवाच्या आकांताने पळत सुटून गंभीर जखमी झाला,तरीही वाघाने पाठलाग केला.परिसरातील नागरिक मदतीला धावले आणि रुग्णालयात दाखल करताच शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची चित्तथरारक घटना काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजे सुमारास उमरेड वनपरिक्षेत्रातील भिवगड शेत शिवारात घडली.भिवा भाऊराव चौधरी वय ४२ वर्षे,रा.भिवगड,ता.उमरेड,जि.नागपूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
भिवा चौधरी यांच्याकडे भिवगड येथे पाच एकर शेती आहे.शेत शिवारातील संपूर्ण परिसर जंगलाने वेढला आहे.काल शुक्रवारी भिवा चौधरी हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत होते.अशातच सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला केला.भिवा चौधरी जिवाच्या आकांताने पळत सुटले आणि आरडाओरड करू लागले.वाघाने पाठलाग केल्यानंतर यामध्ये भिवा चौधरी जखमी झाले.शेतालगतच असलेले रमेश सनेसर, बळीराम चौधरी या दोघांना आरडाओरड लक्षात येताच मदतीसाठी धावले.मदतीसाठी धावताच वाघ जंगलाच्या दिशेने पळाला.हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले भिवा चौधरी यांना तातडीने उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.गावकऱ्यांना नेहमीच वाघ आणि अन्य हिंस्र प्राण्यांचा त्रास होत आहे.शेतीचेही प्रचंड नुकसान सोसावे लागते.प्रकरणी आज,शनिवार ३० ऑगस्टला आमगाव नाका येथे ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन पुकारण्यात येत आहे.
- Advertisement -

