Saturday, June 13, 2026
Homeनागपूरवाघाने पाठलाग केला अन् जिवाच्या आकांताने पळत सुटला.. - गंभीर जखमी शेतकरी...

वाघाने पाठलाग केला अन् जिवाच्या आकांताने पळत सुटला.. – गंभीर जखमी शेतकरी तपासणीअंती मृत घोषित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शेतात कामे करीत असतांनाच अचानकपणे वाघाने हल्ला चढवला.हल्ला चढवताच जिवाच्या आकांताने पळत सुटून गंभीर जखमी झाला,तरीही वाघाने पाठलाग केला.परिसरातील नागरिक मदतीला धावले आणि रुग्णालयात दाखल करताच शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची चित्तथरारक घटना काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजे सुमारास उमरेड वनपरिक्षेत्रातील भिवगड शेत शिवारात घडली.भिवा भाऊराव चौधरी वय ४२ वर्षे,रा.भिवगड,ता.उमरेड,जि.नागपूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
भिवा चौधरी यांच्याकडे भिवगड येथे पाच एकर शेती आहे.शेत शिवारातील संपूर्ण परिसर जंगलाने वेढला आहे.काल शुक्रवारी भिवा चौधरी हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत होते.अशातच सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला केला.भिवा चौधरी जिवाच्या आकांताने पळत सुटले आणि आरडाओरड करू लागले.वाघाने पाठलाग केल्यानंतर यामध्ये भिवा चौधरी जखमी झाले.शेतालगतच असलेले रमेश सनेसर, बळीराम चौधरी या दोघांना आरडाओरड लक्षात येताच मदतीसाठी धावले.मदतीसाठी धावताच वाघ जंगलाच्या दिशेने पळाला.हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले भिवा चौधरी यांना तातडीने उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.गावकऱ्यांना नेहमीच वाघ आणि अन्य हिंस्र प्राण्यांचा त्रास होत आहे.शेतीचेही प्रचंड नुकसान सोसावे लागते.प्रकरणी आज,शनिवार ३० ऑगस्टला आमगाव नाका येथे ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन पुकारण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!