उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांसह विशेष करून विदर्भातील चंद्रपूर,नागपूर,गोंदिया,भंडारा व गडचिरोली व इतर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.जंगलातील वाघ,बिबट,गवे, अस्वले यासारखे वन्यप्राणी आता थेट गावठाण, शेतजमीन आणि रस्त्यांवर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पाणी आणि हिरव्या चाऱ्याच्या शोधात हे प्राणी मानवी वस्तीच्या दिशेने सरकत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.यामुळे वाहनधारकांनाही मोठ्याप्रमाणात धोका वाढला असून काही ठिकाणी अपघातांच्या घटनाही घडत आहेत.अनेक गावांमध्ये वन्यप्राणी थेट शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत.गेल्या अनेक कालावधीपासून गडचिरोली, गोंदिया व इतर ठिकाणी जंगली हत्तींनी धुमाकूळ घालून नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचे वावर वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शेतकरी वर्ग चिंतेत असून रोजच्या जीवनावर याचा परिणाम होत आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता,वन विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. संघर्षग्रस्त गावांच्या सीमा भागात सौर कुंपण उभारणे, वन्य प्राण्यांसाठी पाण्याचे कायमस्वरुपी स्रोत निर्माण करणे,वन्यजीवांना सुरक्षितपणे जंगलात परतविण्याच्या मोहिमा राबविणे आणि ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे अत्यावश्यक ठरत आहे.
वन्यजीवांचा मानवी वस्त्यांजवळ वाढला संचार.. – वन विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

