Wednesday, April 15, 2026
Homeपुणेलग्नाला झाली आठ महिने,तरी पती जवळ येईना; माहिती पडताच नववधूला बसला धक्का...

लग्नाला झाली आठ महिने,तरी पती जवळ येईना; माहिती पडताच नववधूला बसला धक्का…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे: फिर्यादी महिला ही ३० वर्षांची आहे.सदर महिला ही बी.टेक.आणि एम.बी.ए.अशी उच्चशिक्षित आहे.ती एका कंपनीत नोकरीस आहे.जून २०२२ मध्ये तिचा विवाह पुण्यातील एका उच्चशिक्षिततरुणासोबत झाला.तिचा पती अभियंता असून,तोही एका बड्या कंपनीत नोकरीस आहे.लग्नानंतर ते मधुचंद्रासाठी मालदीव येथे गेले होते.पण त्यांच्यामध्ये पती-पत्नीप्रमाणे संबंध आले नाहीत.त्यानंतरही पतीकडून टाळाटाळ सुरू होती.

लग्न होऊन आठ महिने झाले तरी पती जवळ येत नाही.जवळ झोपण्याऐवजी लांब जाऊन झोपतो. याविषयी जाब विचारला तर मला शरीरसंबंध ठेण्याची इच्छा होत नाही असे उत्तर मिळते.हा प्रकार घडलाय पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या चंदननगर परिसरात.याप्रकरणी पत्नीने पती विरोधात चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.लग्नाच्या आठ महिन्यानंतरसुद्धा पती आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही.म्हणून या महिलेने पतीकडे विचारणा केली.तिच्या लक्षात आले की आपला पती शाररिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे.सत्य समजताच तिच्या पायाखालची वाळूच सरकली.आपली फसवणूक झाली असल्याचे समजले.पण पुढे आणखी भयंकर तिच्या आयुष्यात घडणे बाकी होते.

याविषीयी कुठे वाच्यता करू नये म्हणून तिला मारहाण करण्यात येऊ लागली.शाररिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता.यासाठी पती आणि सासू-सासऱ्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण केली.याबाबत विवाहितेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अद्याप कोणाला अटक केलेली नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!