Thursday, June 25, 2026
Homeमुंबईराज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ.. - तब्बल २१ महापालिकांमध्ये वरचढ..

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ.. – तब्बल २१ महापालिकांमध्ये वरचढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील २९ महानगरपालिकांचे आज,शुक्रवार १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आले. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनुसार महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत
भारतीय जनता पक्षच मोठा भाऊ ठरल्याचे दिसून येत आहे.भाजपने विरोधकांना मागे टाकत तब्बल २१ महापालिकांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.भाजपने केवळ जागाच जिंकल्या नाहीत,तर राज्यातील महत्त्वाची आर्थिक आणि राजकीय केंद्रे आपल्या ताब्यात ठेवली आहेत,मुंबईमध्ये शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने मुंबईवर कब्जा केला आहे.तर पुणे,नागपूर आणि नाशिक या मोठ्या शहरांमधील आपली सत्ता भाजपने यशस्वीपणे कायम राखली आहे.भारतीय जनता पक्षाने मुंबई,नवी मुंबई,मीरा भाईंदर,उल्हासनगर, पनवेल,पुणे,पिंपरी चिंचवड, इचलकरंजी,सांगली,मिरज कुपवाड,कोल्हापूर,सोलापूर, नागपूर,अकोला,अमरावती,नाशिक,धुळे,जळगाव, अहिल्यानगर(अहमदनगर),जालना,नांदेड वाघाळा आणि छत्रपती संभाजीनगर इत्यादी महापालिकांमध्ये सत्ता काबीज केली आहे.अश्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यांमध्ये वर्चस्व टिकवून ठेवले आहे.या दोन महत्त्वाच्या महापालिकांवर शिवसेनेचा भगवा कायम आहे.त्यातच, काँग्रेसला केवळ ३ महानगरपालिकांमध्ये यश मिळाले आहे.यामध्ये लातूर,भिवंडी-निजामपूर व चंद्रपूर इत्यादींचा समावेश आहे.उद्धव ठाकरे यांच्या गटाला परभणीमध्ये यश मिळाले आहे,तिथे त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता मिळवली आहे.बहुजन विकास आघाडीने आपले अस्तित्व टिकवत वसई-विरार महापालिकेवर पुन्हा एकदा पकड मजबूत केली आहे.तर मालेगाव महानगरपालिकेचा निकाल मात्र पेचात अडकला आहे.येथे कोणत्याही प्रमुख पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.त्यामुळे सत्तेच्या चाव्या आता अपक्षांच्या हाती आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!