उद्रेक न्युज वृत्त :-सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज,रविवार सकाळपासून चकमक सुरू असून चकमित सुरुवातीला १२ नक्षल्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त समोर आले होते तर आता अधिकृत माहितीनुसार विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात झालेल्या चकमकीत आतापर्यंत ३१ नक्षलिंचा खात्मा करण्यात आला असून दोन जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले आहेत,त्यांना पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने रायपूरला पाठवण्यात आले आहे.उपचाराकरिता चार जवांनाना नेत असतांना वाटेतच दोन जवान शहीद झाल्याची माहिती आहे.सदरची चकमक ही छत्तीसगडच्या बिजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील उद्यानात झाली.सुरक्षा दलाकडून शोध मोहिमे दरम्यान चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.डीआरजी बिजापूर, एसटीएफ, सी-६० चे जवान परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. आज सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत गोळ्यांच्या आवाजाने परिसर बेजार झाले आहे.चकमक थांबण्याचे नाव घेत नसल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाल्याचे वृत्त आहे.अजूनही चकमक सुरूच आहे.
मोठी बातमी सुरक्षा दल-नक्षल चकमकीत ३१ नक्षली ठार तर दोन जवान शहीद; चकमक सुरूच..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

