Tuesday, June 23, 2026
Homeनागपूरमोठी बातमी,काम करण्यासाठी नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी - नागपूर पोलीसांनी...

मोठी बातमी,काम करण्यासाठी नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी – नागपूर पोलीसांनी आरोपींना केली अटक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- नागपुरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मागील महिन्यात नागपूर रेल्वे स्थानकावर ६ अल्पवयीन मुलांसमवेत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.त्यानुसार यांना आरपीएफ आणि ‘बचपन बचाओ संस्थे’च्या प्रतिनिधींनी ताब्यात घेतले होते.त्यानंतर पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.या प्रकरणात मानवी तस्करी करून ही सर्व मुले बिहारमधून आणल्याचे लोहमार्ग पोलिसांनी तपासादरम्यान उघड केले आहे.या प्रकरणी पोलिसांनी शंभू आणि विकास नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर मिळालेल्या मुलांचे चाइल्ड लाइन टीमकडून समुपदेशन केले जाणार आहे.तसेच त्यांची कागदपत्रे तपासून त्यांचे नेमके वय जाणून घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.

आरोपींनी मुलांच्या नातेवाईकांना भुरळ घालून सुरुवातीला ५०० ते १००० रुपये देऊन पेपर मिलमध्ये काम करण्यासाठी मुलांना नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी करण्यात आली व नंतर ही मुले अन्य टोळीतील सदस्यांच्या ताब्यात देण्यात आली होती.मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना महिन्याला १० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवायचे व मुलां कडून मजुरीची कामे करवून घेतली जात होती.मुलांची तस्करी प्रकरणी मुख्य म्होरक्या कोण?याचा  पोलीस शोध घेत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!