नागपूर :-राज्याची अधोगतीकडे वाटचाल होत असल्याचा आरोप केला,तेव्हा सत्तापक्षातील भाजप खंडन करीत होते.राज्य आर्थिकदृष्टया सक्षम आहे. कुठलीही अडचण नाही; असा दावा केला जात होता. आता आथिंक पाहणी अहवालात राज्याची घसरण ११ व्या स्थानी झाली आहे.पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचाच हा अहवाल आहे.आता त्यावर भाजपने उत्तर द्यावे; असे विचारणा करीत महाराष्ट्राचा उडता पंजाब केल्याचे त्यांनी मान्य करावे; असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल शनीवारी बाहेर आला.यात महाराष्ट्राची आर्थिक पातळीवर मोठी घसरण झाल्याचे पुढे आले.सकल उत्पन्नात मोठी घट झाली.महाराष्ट्र यात १३ टक्क्यांवर आले.सत्तापिपासू असलेल्या भाजपने पक्षांची फोडाफोडी केली. त्यानंतरच सरकार आले.अनेक योजना आणल्या.त्या राबविण्यासाठी निधीच नाही.तिजोरी रिकामी असतानाही खोटा बनाव केला.अनेक विभागांचा निधी या योजना राबविण्यासाठी वळता केला.
महाराष्ट्राचा उडता पंजाब केल्याचे ‘त्यांनी’ मान्य करावे- विजय वडेट्टीवार
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

