- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जीवनात हार-जीत व चढ-उतार येतच राहतात.कधी सुख तर कधी दुःख हे जीवन चक्र आहे; मनुष्याला एकदाच अनमोल असे जीवन मिळत असते. मिळालेल्या जीवनाचे सोने करणे हे ज्याच्या-त्याच्या हातात आहे.आपण एकदा हरलो म्हणजे संपूर्ण आयुष्य हरलो,असे होत नाही.तर त्याचा सामना करून पुढील आयुष्य जगून विजय मिळवला पाहिजे.अशातच एका बारावीची परीक्षा दिलेल्या व बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या आपल्या मुलाला मनात नाराजी न बाळगता पुन्हा चांगला अभ्यास कर आणि उत्तीर्ण हो..! असे आई-वडिलांनी प्रोत्साहन देऊनही त्याने आई-वडिलांचे न ऐकता नैराश्यात जाऊन टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविल्याची घटना काल,बुधवारी ७ मे रोजी दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव येथील बजरंग चौकात उघडकीस आली.क्रिष्णा धर्मराज शिवणकर याने घरी कुणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली.विशेष म्हणजे,कालच त्याचा वाढदिवस होता.त्यामुळे घरचे कुटुंबीय आनंदात होते.क्रिष्णा शिवणकर याने यावर्षी आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती.बारावी परीक्षेचा निकाल सोमवार ५ मे रोजी जाहीर झाला. अशातच क्रिष्णा हा परीक्षेत नापास झाला.सगळे सोबती पास झाले,मात्र मीच नापास झालो.त्यामुळे तो नैराश्यात गेला होता.त्यामुळे तो गेल्या दोन दिवसांपासून कुणाशीही धड बोलत नव्हता व त्याच्या वर्तणुकीत बदल झाला होता.अशातच क्रिष्णाने काल बुधवारी नापास झाल्याचा टेन्शन घेऊन घरी कुणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याचे आईवडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयावर मोठा आघात होऊन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

