- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या वरुणराजाने आज पुणे,नाशिक,येवला अमरावती येथे हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.शनिवारी सांगलीतही ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. महाबळेश्वर खोऱ्यातही तुफान पर्जन्यवृष्टी झाली आहे. या पावासामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.दरम्यान,पुढील आठवडा पावसाचा असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील ४,५ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. साधारणपणे पुढील आठवड्यात वरुणराजा दुपारी तसेच संध्याकाळी वरुणराजा हजेरी लावेल; अशी शक्यता हवामानतज्ज्ञ के.एस.होसळीकर यांनी वर्तविला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,राज्यात पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार आहे.कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा,विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान,पुढील ३६ ते ४८ तासात पावसाचे पुनरागमन होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनीही एबीपी या वृत्तवाहिनीला दिली होती.पुढील आठवड्यात तापमानात घट होईल,असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.पुढील आठवड्यात पावसासाठी पोषक वातावरण असल्याने वारे जोरदार वाहतील,त्यामुळे झाडे कोसळणे,वीज कोसळणे, पाणी साचण्याची घटना घडतील,यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी; अशी सुचना हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.राज्यातील कोकण,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता कमी झाली असून राज्यात सर्व भागात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत.मुंबईसह ठाण्यात देखील पुढील आठवड्यात हलक्या पावसाला सुरूवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- Advertisement -

