Saturday, May 23, 2026
Homeनागपूरपत्नीने हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहीत प्रेमाची साक्ष दिली आणि उचलले टोकाचे पाऊल..!

पत्नीने हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहीत प्रेमाची साक्ष दिली आणि उचलले टोकाचे पाऊल..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-संसाराचा गाडा हाकतांना पतीसोबत तिचे वारंवार खटके उडायचे.संसारातील कलह इतका वाढला की,सततच्या भांडणांमुळे पत्नी मनातून खचली.पती-पत्नीचे पटत नसल्याने महिनाभरापूर्वीच ती आपल्या माहेरी परतली होती.माहेरी आल्यानंतरही तिच्या मनातील अस्वस्थता कायम होती.एकांतवासात तिने पुन्हा एकदा आपला संसार सावरण्याचा प्रयत्न केला. पतीला वारंवार फोन लावले,मनातील संवाद साधू इच्छिणाऱ्या मैत्रिणींनाही संपर्क केला.मात्र,पतीने एकही कॉल उचलला नाही.कोणाशीही संवाद न झाल्याने आणि पतीने प्रतिसाद न दिल्याने उदासीन झालेल्या पत्नीने आत्महत्येचा निर्णय घेतला.तत्पूर्वी तिने एक हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहिली,ज्यात तिने ‘आय लव्ह यू संदीप’ म्हणत आपल्या प्रेमाची साक्ष दिली आणि पतीच्या वागण्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट करून राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.मयुरी संदीप मेंढे वय ३४ वर्षे,(माहेरचे नाव मयुरी राष्ट्रपाल मानवटकर, रा.महादुला (कोराडी),ता.कामठी,जि.नागपूर असे मृत पावलेल्या विवाहितेचे नाव असून मयुरीचा विवाह काही वर्षापूर्वी वर्धा येथील संदीप शालिक मेंढे यांच्याशी झाला होता. दोन दिवसांपूर्वी महादुला येथील बौद्ध विहारात कार्यक्रम असल्याने घरातील सर्व मंडळी तिथे गेली होती. मयुरी घरी एकटीच होती.रात्री घरची मंडळी परतल्यावर दरवाजा आतून बंद होता.अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता,मयुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.मयुरीच्या आत्महत्येमुळे तिचे माहेरचे कुटुंब हादरले आहे.मयुरीला पतीकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता,त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले,असा थेट आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून ती चिठ्ठी जप्त केली असून,मयुरीचा भाऊ सुहास याच्या तक्रारीनंतर कोराडी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!