Saturday, September 5, 2026
Homeमुंबईनिवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुकीनंतर सावत्र झाली का? - २ हजार १००...

निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुकीनंतर सावत्र झाली का? – २ हजार १०० रुपये देण्याविषयी घुमजाव; लाडक्या बहिणींना दीडच हजार मिळणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा सरकार आल्यास महिलांना २१०० रुपये देऊ असे महायुतीने म्हटले होते.मात्र निवडणूक पार पडल्यानंतर महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा झाले नाही.उलट निकषाचे कारण देऊन महिलांना योजनेतून कमी केले जात आहे.मात्र काही महिला संजय गांधी निराधार आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत.याचा अर्थ या महिलांकडून सरकारची फसवणूक केली जात आहे.अशा महिलांवर सरकार कारवाई करणार आहे का? असा प्रश्न शिवसेना (ठाकरे)आमदार अनिल परब लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.तर निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुकीनंतर सावत्र झाली का,असा प्रश्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.सरकारची तिजोरी ज्यांनी रिकामी केली,त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा,अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.
या योजनेतून २ कोटी ६३ लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले.सप्टेंबरमध्ये जेव्हा अर्ज भरले गेले तेव्हा २ लाख ५४ हजार महिलांची संजय गांधी निराधार योजनेची आकडेवारी प्राप्त झाली.त्यामुळे त्या-त्या पद्धतीने कारवाई आम्ही करत आहोत,असे मंत्री तटकरे म्हणाल्या.त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या अर्थसंकल्पात महिलांना २ हजार १०० रुपये देऊ,अशी घोषणाच केली नव्हती,असे वक्तव्य महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत केल्याने या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींचे मानधन वाढणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.विरोधकांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडत सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करीत धारेवर धरले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात २ हजार १०० रुपये देण्याची घोषणा करू,असे वक्तव्य केलेले नव्हते.योजना जाहीर झाली असली तरी निवडणुकीतील जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो.त्यामुळे २ हजार १०० रुपयांसाठी योग्य तो प्रस्ताव मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री उपस्थित असतांना मंत्रिमंडळासमोर आमचा विभाग ठेवेल आणि त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल,असे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे सध्यातरी लाडक्या बहिणींना दीडच हजार मिळणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!