Saturday, July 11, 2026
Homeनागपूरना संत्री आला ना मंत्री; वाट पाहून थकल्या,निवेदन फाडले अन् घराकडे परतल्या.....

ना संत्री आला ना मंत्री; वाट पाहून थकल्या,निवेदन फाडले अन् घराकडे परतल्या.. – ही मोठी माणसे आपल्यासारख्या मोलकरणींना काय वेळ देतील?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्या स्थितीत नागपुरात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.अधिवेशन दरम्यान त्या-त्या क्षेत्रातील आमदार सरकारपुढे व्यथा मांडून उपाययोजना करण्यासाठी आवाज उठवत असतात.विशेष म्हणजे, अधिवेशन कालावधीत आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी बरेचजण आंदोलने,मोर्चे काढून सरकारचे तसेच संत्री-मंत्री यांचे लक्ष वेधून घेत असतात आणि आपले काही भले होईल,या आशेवर असतात.अश्याच प्रकारे शासनच नागपुरात आल्यामुळे आपल्या मागण्या मांडाव्या,आपल्यालाही न्याय मिळेल,या आशेपोटी घरची धुणीभांडी करणाऱ्या महिलांनी म्हणजेच ‘मोलकरीण’ यांनी  विधिमंडळावर मोर्चा काढला.मोर्चा काढला खरी, पण सकाळपासून सायंकाळ झाली तरीही त्यांच्याकडे ना कोणता संत्री भटकला ना कोणता मंत्री भटकला.शेवटी राय-राय झाल्या अन् ही मोठी माणसे आपल्यासारख्या मोलकरणींना काय वेळ देतील, असा विचार करून अखेर मोर्चात सहभागी मोलकरणींचा संयम सुटला. कोणालाच आपल्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ नाही, अशी मनोमन समजूत घालत त्यांनी मंत्रिमहोदयांना देण्यासाठी तयार केलेले निवेदन फाडले.मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध केला अन् त्या आपल्या घराकडे परत गेल्या.
काल बुधवारी जागृती मोलकरणी संघर्ष समितीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढला.त्यांनी आपल्या मागण्यांसाठी सकाळीच इतरांच्या घरी जाऊन आपली नियमित कामे पार पाडली.दुपारी १ वाजता त्या यशवंत स्टेडियमवर गोळा झाल्या.पावणे दोन वाजता यशवंत स्टेडियम येथून त्यांचा मोर्चा टेकडी मार्गाकडे निघाला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी विधानभवनात फोन करून कामगार मंत्र्यांना मोलकरणींच्या मोर्चातील शिष्टमंडळाच्या भेटीसाठी वेळ मागितली.परंतु त्यांना ठोस उत्तर मिळाले नाही.त्यानंतर दुपारी अडीच वाजता मोलकरणींचा मोर्चा टेकडी मार्गावर पोहोचला.तेथे रस्त्यावर बसून हातात मागण्यांचे फलक घेऊन त्यांनी नारेबाजी करून आपल्या व्यथा मांडत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी संबंधित पोलिसांनी पुन्हा एकदा कामगार मंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली.परंतु काहीच उत्तर मिळाले नाही.अखेर मोलकरणींनी कामगार राज्यमंत्र्यांच्या भेटीची तयारी दर्शविली मात्र,त्यांचीही वेळ मिळाली नाही.ही मोठी माणसे आपल्यासारख्या मोलकरणींना काय वेळ देतील,असा विचार करून अखेर मोर्चात सहभागी मोलकरणींचा संयम सुटला आणि आपापल्या घरी परतल्या.खरे म्हणजे,घरकाम करणारी,सांगितलेले काम इमानेइतबारे करणाऱ्या या मोलकरीण काबाडकष्ट करून कुटुंबाचे पालनपोषण करतात.आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी एखादा व्यक्ती सरकारकडे नाही तर कुणाकडे अपेक्षा करणार.गोर-गरिबांच्या व्यथा ऐकून घेण्यात कुणालाही रस नसल्याचे सदरच्या प्रकारावरून दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!