- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे प्रकल्प लवकरात-लवकर पूर्ण करून रेल्वेविषयक समस्या व रेल्वेगाड्यांचा थांबा मिळण्यासंदर्भात गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत पत्रक सादर केले आहे.त्याचप्रमाणे छत्तीसगड ते गडचिरोली रेल्वे लाइन भविष्यात करण्याच्या अनुषंगाने नकाशा घेऊन चर्चा केली.यावेळी मतदारसंघातील देसाईगंज रेल्वेस्टेशनवर गाडी क्र.२२१७३ व २२१७४ जबलपूर ते चांदा फोर्ट व चांदा फोर्ट ते जबलपूर गाडी क्र.०७०५१ व ०७०५२ हैदराबाद ते रकसौल व रकसौल ते हैदराबाद या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली.मतदारसंघातीलच आमगाव रेल्वेस्थानक येथे गाडी क्र.१२०६९ व १२०७० रायगड ते गोंदिया व गोंदिया ते रायगड जनशताब्दी एक्स्प्रेसचा थांबा देण्यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.मागील कालावधीत अश्याच प्रकारे प्रवासी रेल्वे गाड्या संदर्भात किरसान यांनी संसदेत मुद्दा उचलून धरल्याने प्रशासन खळबळून जागे होऊन प्रवासी रेल्वे गाड्या देसाईगंज-चांदाफोर्ट-गोंदिया सुरू करण्यात आल्याने रेल्वे प्रवाश्यांनी खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे आभार मानले होते,हे विशेष.
- Advertisement -

