Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदहावीचा निकाल जाहीर; निकालात दोन टक्क्यांची घसरण..

दहावीचा निकाल जाहीर; निकालात दोन टक्क्यांची घसरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच शनिवार,२ मे २०२६ रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता.बारावीत महाराष्ट्र राज्याचा ८९.७९ टक्के एकूण निकाल  लागला होता.यात मुलींनीच बाजी मारून ९३.१५ टक्के उत्तीर्णता मिळवली, तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला.गेल्या वर्षाच्या तुलनेत बारावीच्या निकालात सुमारे २.०९ टक्क्यांची घट झाली. अश्यातच आज,शुक्रवार ८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.यात दहावीचा राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात सुमारे दोन टक्क्यांची  घसरण झाली आहे.यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.९६ टक्के आहे,तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९०.५६ टक्के आहे.राज्यात १४ लाख २० हजार ४८६ एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागीय निकालात कोकण विभाग प्रथम,तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
निकालात घसरण होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे,पूर्वी कॉपी करण्याचे प्रमाण वाढलेले होते.त्यामुळे,रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्यांना कमी टक्केवारी,तर कॉपी करणारे वरचढ ठरायचे.मात्र,गेल्या दोन वर्षांपासून शासनाने कॉपीमुक्त अभियान सुरू केल्याने अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस घाम फुटू लागला आहे.हे विशेष.
  •  विभागनिहाय निकाल👇
१.नागपूर- ८९.०७ टक्के
२.पुणे- ९४.२४ टक्के
३.कोकण- ९७.६२ टक्के
४.मुंबई- ९४.९७ टक्के
५.कोल्हापूर- ९५.४७ टक्के
६.अमरावती- ९०.५० टक्के
७.छत्रपती संभाजीनगर- ८८.४१ टक्के
८.नाशिक- ९०.५३ टक्के
९.लातूर- ८८.४२ टक्के
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!