Friday, August 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदहावीचा निकाल जाहीर; निकालात दोन टक्क्यांची घसरण..

दहावीचा निकाल जाहीर; निकालात दोन टक्क्यांची घसरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच शनिवार,२ मे २०२६ रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता.बारावीत महाराष्ट्र राज्याचा ८९.७९ टक्के एकूण निकाल  लागला होता.यात मुलींनीच बाजी मारून ९३.१५ टक्के उत्तीर्णता मिळवली, तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला.गेल्या वर्षाच्या तुलनेत बारावीच्या निकालात सुमारे २.०९ टक्क्यांची घट झाली. अश्यातच आज,शुक्रवार ८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.यात दहावीचा राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात सुमारे दोन टक्क्यांची  घसरण झाली आहे.यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.९६ टक्के आहे,तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९०.५६ टक्के आहे.राज्यात १४ लाख २० हजार ४८६ एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागीय निकालात कोकण विभाग प्रथम,तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
निकालात घसरण होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे,पूर्वी कॉपी करण्याचे प्रमाण वाढलेले होते.त्यामुळे,रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्यांना कमी टक्केवारी,तर कॉपी करणारे वरचढ ठरायचे.मात्र,गेल्या दोन वर्षांपासून शासनाने कॉपीमुक्त अभियान सुरू केल्याने अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस घाम फुटू लागला आहे.हे विशेष.
  •  विभागनिहाय निकाल👇
१.नागपूर- ८९.०७ टक्के
२.पुणे- ९४.२४ टक्के
३.कोकण- ९७.६२ टक्के
४.मुंबई- ९४.९७ टक्के
५.कोल्हापूर- ९५.४७ टक्के
६.अमरावती- ९०.५० टक्के
७.छत्रपती संभाजीनगर- ८८.४१ टक्के
८.नाशिक- ९०.५३ टक्के
९.लातूर- ८८.४२ टक्के
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!