- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घालून सर्वसामान्य नागरिकांची घरे,जनावरे,जीवनावश्यक वस्तू तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून शेतकऱ्यांपुढे मोठे संकट ओढवले आहे.आधीच पावसामुळे होत्याचे नव्हते झाल्याने दिवाळीसारखा मोठा सण कसा साजरा करायचा?या विवंचनेत असतांनाच सरकारने तिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्यांना शॉक देत एसटीची दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने दरवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
रोजची रोजी-रोटी कमवून खाणारे,कामासाठी बाहेर पडलेले कामगार,विद्यार्थी व इतर सर्वसामान्य नागरिक दिवाळीसारख्या मोठ्या सणात घरी परत येत असतात. नेमकी हीच संधी साधून सरकारने पुढील महिन्याच्या १५ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर या काळात एसटीच्या तिकिट दरात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान,जानेवारी २०२५ मध्ये एसटी महामंडळाने १४.९५ टक्के दरवाढ लागू केली होती.हे दर एसटीच्या सर्व सेवांसाठी लागू करण्यात आले होते.तर आता शिवनेरी व शिवाई या दोन बसेस सोडता इतर एसटी बसेससाठी दिवाळीत १० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे.सणासुदीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी भर पडून मोठा आर्थिक फायदा होणार आहे.पण, “या हाताने देणे आणि दुसऱ्या हाताने नेणे”,असे चालू धोरण सरकार राबवित असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.त्यामुळे न दिलेलं बरं,अशी वाणी अनेकांच्या मुखातून उमटू लागली आहे.
- Advertisement -

