Friday, May 1, 2026
Homeनागपूरडॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात केला पक्ष प्रवेश

डॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात केला पक्ष प्रवेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- गडचिरोली जिल्ह्याचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज दिनांक -२६ मार्च रोजी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.यामुळे काँग्रेसला विदर्भात पुन्हा धक्का बसला आहे.

नागपूर -विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे सहकारी व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे डॉ.नामदेव उसेंडी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.त्यानंतर नागपुरात आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.काँग्रेसमध्ये पैसेवाल्यांनाच उमेदवारी दिली जाते; असा गंभीर आरोप करीत माजी आमदार उसेंडी यांनी आज आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाने प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे.या जागेसाठी गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हेही इच्छूक होते.त्यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.परंतुपक्षाने डॉ.किरसान यांच्यावर विश्वास टाकला.यामुळे आपण आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांच्याकडे पाठविल्याचे डॉ. उसेंडी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!