Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीजनगणना प्रशिक्षण संपन्न; डिजिटल जनगणनेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन.. - "जनगणना-२०२७"...

जनगणना प्रशिक्षण संपन्न; डिजिटल जनगणनेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन.. – “जनगणना-२०२७” देशातील १६ वी तर स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- “जनगणना ही शासनाच्या नियोजन प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा पाया असून या कार्याची अचूकता व पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणातील सर्व बाबी आत्मसात करून जनगणना कार्य विहीत वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करा,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जनगणना संचालनालय,मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ते २८ मार्च २०२६ या कालावधीत जनगणना-२०२७  प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,यावेळी होणारी जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार असून त्यासाठी तांत्रिक कौशल्य व अचूक माहिती संकलन अत्यावश्यक आहे.प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक बाब बारकाईने समजून घेतली पाहिजे, जेणेकरून प्रत्यक्ष काम करतांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.जनगणना प्रक्रियेत लहानसहान त्रुटीदेखील भविष्यातील धोरणात्मक निर्णयांवर परिणाम करू शकते,त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे,असेही त्यांनी नमूद केले.
या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व जनगणना अधिकारी, लिपीक व तांत्रिक सहाय्यक यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान जनगणना प्रक्रियेतील विविध टप्पे, माहिती संकलन पद्धती तसेच डिजिटल प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी जनगणना संचालनालय,मुंबई येथील सहाय्यक संचालक जोगेंद्र तामगाडगे व चेतन गायधाने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी आशिष वानखेडे व तहसिलदार संतोष आष्टीकर यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
“जनगणना-२०२७” ही देशातील १६ वी व स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असून ती दोन टप्प्यांत पार पडणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनगणनाकार्य अधिक सक्षम व परिणामकारक होण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

काय सांगता..? फेरफार नामंजूर करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला झोडपले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-'शासकीय काम अन् काही दिवस थांब ' हे ठीक आहे.पण,एखादा काम बिघडला अन् संयमाचा बांध फुटला,तर समोरील व्यक्ती कोण? याचा जराही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!