Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीजग कितीही यांत्रिक झाले तरी प्रत्येक क्षेत्रात मजूर गरजेचाच... - फुकट्या योजनांमुळे...

जग कितीही यांत्रिक झाले तरी प्रत्येक क्षेत्रात मजूर गरजेचाच… – फुकट्या योजनांमुळे श्रमाला किंमत नाही; धान कापणीला मजूर मिळेना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-परतीच्या पावसाने रजा घेतल्याचे चिन्ह दिसताच धान कापणीला जिल्ह्यात वेग आला आहे. हलक्या धानासह मध्यम कालावधीचे धान कापणीचा हंगाम एकाच वेळी आल्याने मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे.अत्यल्प प्रमाणात यांत्रिक पद्धतीने कापणी होत असल्याने मजूर टंचाईची समस्या आवासून उभी आहे.किमान महिनाभर हंगाम जोमात चालणार आहे.
जिल्ह्यात बाराही तालुक्यात धान कापणी बांधणीचा हंगाम सुरू झाला आहे.दरवर्षी प्रत्येक हंगामात मजूर टंचाईचा सामना शेतकरी बांधवांना करावाच लागतो. दिवसेंदिवस मजुरांच्या संख्येत घट होत असल्याने समस्या आवासून उभीच आहे.त्यामुळे शेती करणे खूप अवघड होत आहे.एकीकडे निसर्गाचा दणका व त्यात पुन्हा मजूर टंचाईचा चटका शेतीला संकटात नेणारा आहे.मजुराशिवाय शेती करणे अशक्य आहे.जग कितीही यांत्रिक झाले तरी प्रत्येक क्षेत्रात मजूर गरजेचाच आहे.
शासनाने विविध स्तरावर फुकट योजनांचा बाजार मांडल्याने श्रमाला किंमत उरली नाही.महिला व पुरुष निष्ठेने व जबाबदारीने श्रम उपसायला तयार होत नाही.महिन्याकाठी फुकट राशन,नगदी दरमहा अनुदान योजनांमुळे सहजतेने रुपये उपलब्ध होत असल्याने मजूरवर्ग शेतात घाम गाळायला धजावत नाही.प्रत्येक क्षेत्रात मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!