Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार...

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी'(PM-Kisan) योजनेचा २२ वा हप्ता आज,शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला.या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते.याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर तसेच जिल्ह्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पीएम किसान योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी देय असलेल्या २२ व्या हप्त्याकरिता एकूण १ लाख ५४ हजार पात्र शेतकरी निश्चित करण्यात आले आहेत. यातील शेतकरी लाभार्थ्यांना प्रत्येकी २,००० रुपये प्रमाणे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे(DBT)निधी वितरित करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.ज्या शेतकऱ्यांचे ई -केवायसी पूर्ण आहे,बँक खाते आधारशी संलग्न आहे आणि भूमी अभिलेख नोंदणी पूर्ण आहे,अशाच पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दर चार महिन्यांनी दिला जातो आणि वर्षाला ६ हजार रुपये वितरीत करण्यात येतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!