Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली-चिमूर लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्ष हरला तर राजकीय संन्यास घेऊ- विजय वडेट्टीवार..

गडचिरोली-चिमूर लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्ष हरला तर राजकीय संन्यास घेऊ- विजय वडेट्टीवार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना म्हटले की,काँग्रेसने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची जागा हरल्यास राजकीय संन्यास घेऊ; अशी घोषणा केली आहे.तसेच महाराष्ट्र राज्यासह देशभर भाजपविरोधी वातावरण असताना देखिल एक्झीट पोलचे आकडे म्हणजे ‘दाल में कुछ काला है’ असे विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.

वडेट्टीवार म्हणाले, इंडिया आघाडी विदर्भात १०,तर राज्यात ३५ जागा जिंकेल.प्रचारादरम्यान आम्ही घेतलेल्या सभांना लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. परंतु,सत्ताधाऱ्यांना खूश करण्यासाठी एक्झीट पोलचे आकडे भाजपच्या समर्थनार्थ दिले गेले आहेत. मतमोजणीस कितीही उशीर झाला तरी चालेल,मात्र सी-१७ फॉर्म मशिनबरोबरच लावून येणाऱ्या फॉर्मची आकडेवारी जुळल्याशिवाय एव्हीएम मशिन उघडली जाऊ नये; अशी सूचना आपण केल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.

निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली आहे.परंतु भाजप ही निवडणूक धार्मिक मुद्द्यांवर लढत असताना आयोग गप्प का होता, एका मतदारसंघात मतदान सुरु असताना बाजूच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या गेला,तो आचारसंहितेचा भंग नाही काय? असे प्रश्न देखिल वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील निवडणूक ही लोकांनीच हातात घेतली होती.लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध प्रचंड राग होता.असे असतानाही एक्झीट पोल भाजपच्या बाजूने कौल दाखवत असेल तर दाल में कुछ काला है,असे समजण्यास भरपूर वाव आहे.ही निवडणूक काँग्रेस पक्ष हरला तर राजकीय संन्यास घेऊ; अशी भूमिकाही वडेट्टीवार यांनी मांडली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!