Monday, July 13, 2026
Homeनागपूरओबीसी समाज सैरभैर होण्या मागचे मुख्य कारण म्हणजे नेत्यांच्या कोलांटउड्या…-राष्ट्रीय ओबीसी मुक्ती...

ओबीसी समाज सैरभैर होण्या मागचे मुख्य कारण म्हणजे नेत्यांच्या कोलांटउड्या…-राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत खंत व्यक्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- देशात मोठ्या संख्येत ओबीसी समाज आहे. मात्र,त्याला त्याचे अपेक्षित हक्क मिळालेले नाहीत. समाजातील नेत्यांच्या कोलांट उड्यामुळे हा समाज आज सैरभैर झाला आहे; अशी खंत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.

प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ओबीसी समाजाला त्यांचे हक्क आणि न्याय देण्याच्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र निवडणुका झाल्यानंतर आश्वासनांची पूर्तता होत नाही.त्यामुळे या लोकसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी जनतेच्या काय अपेक्षा आहे; त्याचा जाहीरनामा आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत; असे मत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ओबीसी समाजाला नोकरीत,शिक्षणात आरक्षण आहे.मात्र, समाजाच्या विकासासाठी आवश्यक राजकीय हक्क अर्थात निवडणुकांमध्ये आरक्षण मिळत नाही,उच्च पदांवरही आरक्षण मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.एकीकडे नेतेमंडळी विकासाचा विश्वगुरू होण्याची भाषा करतात.मात्र समाजाचे मागासलेपण वाढत असताना हे कसे शक्य आहे; असा प्रश्न त्यांनी केला.यावेळी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.पत्रकार परिषदेला गीता महाले,लक्ष्मीकांत मोहोड,भूषण दडवे, असलम खातमी,प्रा.दिवाकर मोहोड आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!